तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
आपल्या समाजात पती निधनानंतर अंत्यविधी वेळी त्या विधवेच्या बांगड्या फोडणे,तिच्या कपाळावरील कुंकू पुसणे,तिचे सौभाग्यांलंकार काढून घेणे पुढे कोणत्याही धार्मिक कार्यात तिला सहभागी होता येत नाही अशा प्रथा आहेत हा तिच्या सन्मानाचा अपमान आहे.कायद्याने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे मात्र वरील प्रथा परंपरेने तिच्या हक्कावर गदा येते व कायद्याचे उल्लंघन होते. तसेच गावामध्ये जनजागृती करण्याचे आवाहन ग्रामपंचायतींच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे व विविध स्तरातून या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.
कुंभारगाव येथील सांस्कृतिक भवन येथे ही ग्रामसभा झाली या वेळी सरपंच सौ सारिका पाटणकर, उपसरपंच राजेंद्र चव्हाण, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, माजी अर्थ, शिक्षण सभापती संजय देसाई, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक अनिल जाधव, शंकरराव चव्हाण, राजेंद्र देसाई, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
__________________________________
-सरपंच सौ सारिका पाटणकर
___________________________________