तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
या काळात अनेक विचारवंतांचा सहवास लाभला. माझ्यामते शिक्षक, प्राचार्य यांना जगदीशचंद्र बोस यांचा डोळा तर रवींद्रनाथ टागोरांचे हृदय असायला हवे. त्यांच्याच हातून नवनिर्मिती घडते. अनेक वर्षानंतरची गुरूजन - विद्यार्थी -विद्यार्थिनिंच्या अनोख्या भेटीने सर्वजण आनंदून - सुखावून गेले होते. आपल्या गुरुदेवांनी आदर्श जीवन जगत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या ज्ञानाची मोठी गुंतवणूक करून असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनाला चांगला आकार दिला. सद्भावना, प्रेम, सद्विचार, वासल्य, बंधुभाव या संस्कारासोबतच जीवन जगण्याचे ज्ञान रुजविले. या गुरुऋणातून उतराई होणे अशक्य आहे अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
मा.प्राचार्य डॉ.अरुण गाडे व वाल्मिकी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक मा. अशोक माने यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व स्वागत समारंभात *माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष मा राजाभाऊ माने म्हणाले* , शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि थोर देशभक्त स्वातंत्र्यसेनानी काकासाहेब चव्हाण या दोन महर्षींच्या पवित्र चरण कमळांनी ही नागटेकडी पुनीत झाली आहे. मी आज ज्या क्षेत्रामध्ये उभा आहे तो या माझ्या कॉलेजमुळेच. विद्यार्थी -विद्याथिनींच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी मंडळ सर्वतोपरी सहकार्य करील असे ते म्हणाले. कॉलेज परिसरात प्रशस्त क्रीडासंकुल उभारण्याचे माजी विद्यार्थ्यांचे स्वप्न लवकरच पूर्णत्वाला नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखविला. समाजउपयोगी शिबीरे, व्याख्यानमाला आयोजन, प्रशिक्षण उपक्रम आदी उपक्रमांना महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पाहुण्यांचा परिचय
प्रा.उत्तमराव माने यांनी करून दिला.सुत्रसंचालन प्रा.सुरेश रजपूत, प्रा. सुरेश यादव , प्रा. सचिन पुजारी, श्री. प्रशांत जंगाणी यांनी केले. आभार मा.प्राचार्य आर. के.भोसले यांनी मानले.